महाराष्ट्रात शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा एप्रिलमध्ये होणार
Teacher Recruitment Aptitude Test in April
महाराष्ट्र राज्यात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१७ मध्ये उठविण्यात आली व डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यात पावणेदोन लाख बीएड, डीएडधारकांनी पात्रता सिद्ध केली. मात्र दोन वर्षे भरतीच करण्यात आली नाही नंतर २०१९ मध्ये मुलाखतीशिवाय नेमावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील साडेतीन हजार पदे भरण्यात आली. मुलाखतीसह खासगी संस्थांच्या शाळांमधील जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत.
शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यातच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्तांना सूचना केली होती. मात्र टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेबवारीचा महर्त टळला आता एप्रिल महिन्यात परीक्षेचे आयोजन होणार असल्याची सूचना उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली आहे.
- लोकमत
0 Comments