महाराष्ट्रातली कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
Colleges in Maharashtra closed till 15 February
महाराष्ट्रातली कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलंय. यामध्ये अकृषी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांचा समावेश आहे
ऑनलाईन माध्यमातून वर्ग आणि शिक्षण सुरू राहणार आहे. संबंधित महाविद्यालय आणि विद्यापीठांची वसतिगृह बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पण जे विद्यार्थी परदेशातून संशोधनासाठी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावं यासाठी त्यांना वसतिगृहात राहता येईल. शिक्षकांच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण हे सुरू राहील.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇
नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇
0 Comments